मुंबई विद्यापीठ हे भारतातील विद्यापीठांपैकी एक जुने आणि प्रमुख विद्यापीठ आहे.
"वुड्स शैक्षणिक योजने" अंतर्गत मुंबई विद्यापीठची स्थापना सन १८५७ मध्ये झाली आणि भारतातील
प्रथम तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मिळवला.
"बाँम्बे" शहराचे "मुंबई" असे नामकरण झाल्यामुळे विद्यापीठाचे नाव
"बाँम्बे विद्यापीठ" ऎवजी "मुंबई विद्यापीठ" असे झाले; सदर अधिसूचना ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र सरकार
द्वारा लागू केलेल्या राजपत्रात प्रकाशित झाली.
|